ताज्या घडामोडी

महामार्गावर हेल्मेट वापरण्याबाबत अनास्था जीवघेणीमहामार्गावरील वाढते अपघात अत्यंत चिंताजनक, अकोल्यात वाहन चालवणे झाले जिकरीचे !

AB7

महामार्गावर हेल्मेट वापरण्याबाबत अनास्था जीवघेणीमहामार्गावरील वाढते अपघात अत्यंत चिंताजनक, अकोल्यात वाहन चालवणे झाले जिकरीचे 

 

अकोला :महामागीवरील अपघातातील मृत्यूला दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे हे न प्रमुख कारण असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वतः सोबतच कुटुंबाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर हितावह आहे.आपल्या कडील रस्ते आता चौपदरी झाले. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला. दुचाकीस्वार सुसाट वेगाने गाड्या चालवतात. परंतु सुरक्षेचा विचार होत नाही. महामार्गावर दुचाकी चालवताना हेल्मेट घातले असेल तर डोक्याला इजाहोण्याची शक्यता कमी राहते. आणि अपघातात मृत्यू होण्याचे मुख्य कारण डोक्याला झालेली गंभीर इजा हेच असते. दोन दिवसांपूर्वी अकोल्यातीलमलकापूर भागातील एका व्यक्तीचा महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. अनेकांना हेल्मेट शिवाय वाहन चालवल्याने प्राण गमवावे लागत आहेत.खरेतर अकोला सारख्या शहरात देखील वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. मुख्य चौकात कोण कोठून येईल अंदाज येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणे आवश्यक झाले आहे. अकोला शहरात हेल्मेट वापराबाबत पोलीस प्रशासन आग्रही होते. परंतु पुन्हा ढिलाई दिसते. काही चौकात कारवाई होते तर अन्य ठिकाणी तसेच जाऊ दिले जाते. कारवाई मध्ये एकसूत्रता नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालून वाहन चालवणे केव्हाही चांगले. यासाठी नियम घालून दिलेच पाहिजे

 

 

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.