ताज्या घडामोडी

खरेदी केंद्रावर पोहोचून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या खरेदी केंद्र संचालकांना दिले योग्य निर्देश

Satish Pawar

. सावरकरांच्या सूचनेनंतर अर्ध्या तासात पूर्ववत सुरू झाली सोयाबीनची ऑनलाईन नोंदणखरेदी केंद्रावर पोहोचून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या खरेदी केंद्र संचालकांना दिले योग्य निर्देशū

 

अकोला- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन जलद गतीने व पूर्णपणे विक्री करता यावे यासाठी शासनाने ऑनलाइन नोंदणी करीता 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. दरम्यान गुरुवार दि. 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया खंडित झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून आ. रणधीर सावरकर यांना प्राप्त झाल्या. आ. सावरकरांनी तातडीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली.  शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आ. रणधीर सावरकर यांनी लाखनवाडा येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर भेट देऊन तेथील खरेदी यंत्रणेची पाहणी केली व संबंधितांना योग्य निर्देश दिले. लाखनवाडा केंद्रावर गुरुवारी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या होत्या. गोडाऊन मध्ये जागा नाही असे कारण पुढे करून खरेदी प्रक्रिया बाधित झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आ. सावरकर यांच्यासोबत मोबाईल वरून संपर्क साधून आपल्या अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याकरिता आ. सावरकर यांनी तातडीने लाखनवाडा येथील फार्मर प्रोडूसर कंपनी च्या खरेदी केंद्रावर भेट देऊन यंत्रणेला योग्य सूचना दिल्या. तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना कोणताही शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.  यावेळी आ. रणधीर सावरकर यांच्यासोबत अंबादास उमाळे, डॉ. शंकरराव वाकोडे, माधव मानकर, दिलीप मिश्रा, जयंत मसने, विठ्ठल सातारकर, राजेश ठाकरे, रवी गावंडे, किरण थोरात, अभय थोरात, गणेश तायडे, किशोर कुचके, विपुल घोगरे, राजेश बेले, पंकज वाडीवाले, वसंतराव गावंडे, अनमोल गावंडे, अनिल गावंडे, संदीप गावंडे, अमोल गीते, गणेश अंधारे, गोपाल मुळे, वैभव माहोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

 

 

 

Comments

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.