ताज्या घडामोडी

आज ( 20जानेवारी ) सर्वधर्मीय, सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा* वैशाली देशमुख, आमदार सुरेश धस, मनोज जरांगे करणार नेतृत्व

Akola B7

आज ( 20जानेवारी ) सर्वधर्मीय, सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा वशाली देशमुख, आमदार सुरेश धस, मनोज जरांगे करणार नेतृत्व


अकोला: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवार, दि. 20 जानेवारी रोजी अकोल्यात सर्वधर्मीय, सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत राजेश देशमुख यांनी दिली. या मोर्चाचे नेतृत्व व प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन वैशाली संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. दोन्ही गुन्ह्यातील मारेकऱ्यांना, गुन्हेगारांना aफाशीची शिक्षा देण्यात यावी. या दोघांच्याही कुटुंबाला न्याय द्यावा. महाराष्ट्राला बिहार बनवण्याचे प्रयत्न करीत असलेल्या प्रवृत्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात अकोला जिल्ह्यातील सर्वपक्षीय व सर्वधर्मीय जनतेचा सहभाग असणार आहे. सर्व जाती-धर्माच्या पक्षाच्या विविध सामाजिक संघटनेच्या बंधू भगिनींनी, युवक-युवती, महिलांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. परिषदेला राजश्री देशमुख, प्रशांत जानोरकर, राजेशकाळे झेंडे दाखवून निषेधजनआक्रोश मोर्चा आज दि.20 जानेवारीला दुपारी 2 वाजता स्थानिक अशोक वाटिका परिसरातून निघून सामान्य रुग्णालय नियोजित मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल व त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहेत.देशमुख, गजानन हरणे, संजय वानखडे, शौकत अली शौकत, पंकज साबळे, विनायक पवार, संजय सूर्यवंशी, नंदकिशोर गावंडे, संजय देशमुख, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.